🕒 1 min read
IPL 2025 मधील गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात विजय मिळवूनही कर्णधार शुबमन गिल चर्चेचा विषय ठरला. सामन्यादरम्यान एका रनआउटच्या निर्णयावरून त्याचा पंचांशी वाद झाला होता. तसेच हैदराबादच्या डावात अभिषेक शर्माही एलबीडब्ल्यू रिव्ह्यूवर नाराज दिसला.
सामना संपल्यानंतर गिलने स्पष्ट केलं की, “माझी थोडीशी चर्चा झाली, कारण कधी कधी भावना अधिक तीव्र असतात. आपण मैदानात 110 टक्के देतो, त्यामुळे असं घडणं स्वाभाविक आहे.”
Shubman Gill Reacts to Umpire Dispute in IPL 2025
गुजरातने या सामन्यात 224 धावा केल्या आणि हैदराबादला 186 धावांवर रोखत 38 धावांनी विजय मिळवला. गिलने संघाच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. त्याने सांगितलं, “काळ्या मातीच्या खेळपट्टीवर षटकार मारणे सोपे नाही, पण आमचं नियोजन आणि धावांसाठी असलेली भूक आम्हाला पुढे नेत आहे.”
या विजयामुळे गुजरात टायटन्सचे प्लेऑफकडे एक पाऊल जवळ गेले आहे, तर हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहीण योजनेतील २१०० रूपये कधी? मंत्री उदय सामंत यांचं मोठे विधान
- Suryakumar Yadav | जे रोहित-विराटलाही जमलं नाही ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; सूर्यकुमारने रचला इतिहास
- Sanjay Dutt | ‘तिच्या आई-वडिलांमुळे आमचा संसार मोडला…’, घटस्फोटावर संजय दत्तचं मोठं वक्तव्य