🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी
हिंदी भाषा अनिवार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या वादावर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, हिंदीचा विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “हिंदी ही देशाची भाषा आहे. ती शिकण्यात काहीच गैर नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
संजय निरुपम म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने मराठी शिकलीच पाहिजे. पण त्याचबरोबर मूलभूत हिंदी शिकणं देखील गरजेचं आहे. काही लोक इंग्रजी शिकण्यास विरोध करत नाहीत, त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकवतात, पण हिंदीला विरोध करतात, हे दुहेरी धोरण आहे. काही मनसे नेत्यांची मुले इंग्रजी आणि जर्मन शिकतात, पण त्याचवेळी ते हिंदीला विरोध करतात. याला काही अर्थ नाही, असल्याचे म्हणत नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली.”
Sanjay Nirupam Defends Hindi, Slams Raj Thackeray MNS
वक्फ बोर्डासंदर्भात सुप्रीम कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर संजय निरुपम म्हणाले, “तुमच्या मंदिर ट्रस्टमध्ये बिगर हिंदू सदस्य घ्याल का, हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण वक्फ ही धार्मिक संस्था नसून एक सरकारी संस्था आहे. त्यात कोणताही धार्मिक पॅनल नसतो.”
बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणावरून उद्धव ठाकरे गटावर टीका करत निरुपम म्हणाले, “ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांनी विश्वासघात केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत निरुपम म्हणाले, “ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत आहेत आणि त्याच्याच दिशेने काम करत आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- हिंदी भाषा अनिवार्य केल्याने मनसे आक्रमक; देवेंद्र फडणवीस म्हणाले..!
- गिरीश महाजनांवर Sanjay Raut यांचा हल्लाबोल; कानातील बोळे काढून ऐकावं..!
- वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजेंची भूमिका ठाम, “समाधी हटवावीच लागेल”